वाचक मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला
जानेवारी १९९९ मध्ये
प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर,
सुरेखा कुडची, प्रदीप पटवर्धन
यांची प्रमुख भूमिका
असलेला आणि अजय
फणसेकर दिग्दर्शित ‘रात्र आरंभ’
हा चित्रपट किंवा
मार्च २००४ साली
प्रदर्शित अतुल कुलकर्णी,
सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार,
तुषार दळवी यांची
प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा
भावे आणि सुनील
सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला
‘देवराई’ हा चित्रपट
आठवतो का? मी
हे विचारतोय कारण
हे फक्त करमणूकप्रधान
चित्रपट नव्हते, तर माहितीपटाच्या
चौकटीत जाणारे; मात्र त्याचवेळी
माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत
मनोरंजन करणारे देखील होते.
हे दोन्ही चित्रपट
स्किझोफेनिया या गंभीर
स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या
प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते.
‘रात्र आरंभ’ हा चित्रपट
मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia) आधारित पहिला चित्रपट
मानला जातो, तर
‘देवराई’ हा चित्रपट
मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत
संवेदनशीलपणे आणि मोठ्या
प्रमाणात सखोलतेने भाष्य करतो.
स्किझोफेनिया
हा कोणाच्याही आयुष्यात
येऊ शकणारा आजार
आहे. तो कोणत्याही
व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसतो.
त्यामुळे अशा व्यक्तींना
दोष देणे किंवा
त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे
चुकीचे आहे. “स्वीकारा” या
संकल्पनेत प्रत्येक व्यक्तीला समानतेने
वागवण्याचा संदेश दिला जातो.
सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!
मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेसी साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही.झोपायला जे...



Comments
Post a Comment