Posts

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...

Image
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही  आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर  झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ?      तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन  १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या  नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती  मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका.  भाषा मरता देशही मरतो संस...

चला स्किझोफेनिया समजून घेउया आणि रुग्णाचा स्वीकार करूया

Image
वाचक मित्र - मैत्रिणींनो तुम्हाला जानेवारी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर , सुरेखा कुडची , प्रदीप पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अजय फणसेकर दिग्दर्शित ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट किंवा मार्च २००४ साली प्रदर्शित अतुल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी , देविका दफ्तरदार , तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘ देवराई ’ हा चित्रपट आठवतो का ? मी हे विचारतोय कारण हे फक्त करमणूकप्रधान चित्रपट नव्हते , तर माहितीपटाच्या चौकटीत जाणारे ; मात्र त्याचवेळी माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत मनोरंजन करणारे देखील होते . हे दोन्ही चित्रपट स्किझोफेनिया या गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते . ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia) आधारित पहिला चित्रपट मानला जातो , तर ‘ देवराई ’ हा चित्रपट मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे आणि मोठ्या प्रमाणात सखोलतेने...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग 2)

Image
सध्या आपले महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे, हे आपण कालच्या भागात बघितले. कालच्या भागाला वाचकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी मला वैयक्तिक व्हाट्सअप वर प्रतिक्रिया कळवल्या,आणि हा लेख लिहीत असताना देखील कळवत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचे  मनापसून धन्यवाद.  आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया मला लिहण्यासाठी खुप बळ देतात. असो. कालच्याच लेखात मी मांडु इच्छिणारा मात्र विस्तार भयास्तव न मांडलेला मुद्दा मांडण्यासाठी मी हा लेखाचा दुसरा भाग लिहीत  आहे. तर वाचक मित्र-मैत्रिणींनो, मी एसटी बसचा चाहता आहे. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी 'माझे प्रवाश्याचे आवडते माध्यम भाग 1 आणि 2' या अल्बमद्वारे  सुमारे २,५०० (हो अडीच हजार ) एसटी बस आणि एसटी विषयक बातम्याचे फोटो अपलोड केले आहेत. एसटी बसच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया या ४जिल्ह्याचा अपवाद वगळता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे.‌तसेच महाराष्ट्राबाहेरील अहमदाबाद, बंगळूरू, इंदौर, पणजी या शहरांना देखील भेटी दिल्या आहेत. हे जेव्हा ...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

Image
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

Image
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

आता फक्त ५ बाकी!

Image
सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची .       अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास...

नेमीची येते अवकाळी

Image
मी हा मजकूर लिहीत असताना पुणे शहर परिसरात अवकाळी पावसामूळे नागरिक धास्तावले आहेत. २ एप्रिल रोजी दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे परिसरात एका मराठी वाक्यप्रचाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे तो म्हणजे ' नेमीची  येते अवकाळी'.  नेमेची येतो पावसाळा या मराठी वाक्यप्रचारात  पावसाळी  या शब्दाचा जागी अवकाळी हा शब्द बदल करत  ही चर्चा रंगली आहे . तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५  वर्षाचा आढावा घेतला तर, या वर्षात मार्च  ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हे चक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच. तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील, तर पुढच्या वेळी तुम्ही  फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.  मात्र असे असले तरी  देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे. आपणांस जर काही ठोस ...