Posts

फक्त अनावश्यक सवलती आवरा !

Image
प्रति  देवेंद्रजी फडणवीसजी   मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेशी  जय महाराष्ट्र  साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली.  मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते‌.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल ५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब.  लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता ...

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

Image
मा‌.प्रताप सरनाईक, साहेब परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य   सप्रेम जय  महाराष्ट्र  साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील एसटी बसचे आर्थिक उत्पन वाढावे, आणि प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी एसटी बस स्टँडपासून २०० मीटरच्या हद्दीत खासगी वाहतूक होणार नाही, हे बघण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आपण नुकतेच जाहिर केले. एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाययोजना करत आहात,हे बघून आनंद वाटला. आज आपल्या महाराष्ट्रात अनेक पालक आपल्या मुलीला फक्त कमी तिकीट आहे, म्हणून घरापासून दूर असलेल्या गावात शिक्षणासाठी पाठवत आहेत.त्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकण्यासाठी एसटी टिकणे आवश्यक आहे. साहेब, मी  एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या ४ जिल्ह्याचा अपवाद वगळता आपली महाराष्ट्राची एसटी जाते अस्या राज्याच्या काना कोपऱ्यात आणि राज्याबाहेर अहमदाबाद,सुरत, इंदोर, बेळगाव, बंगळूरू,पणजी, वापी आदी ठिकाणी  फिरलोय. या फिरण्यात मला काही बाबी निर्दसनास आल्या आहेत.ज्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत म...

शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...

Image
पुणे शहरात  दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार  दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे  फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक  हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी  घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी  याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल .  मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती.  इंटरनेटवर तुम्ही ...

आत्महत्येच्या विळख्यात तरुणाई .. !

Image
कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य  .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे  तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच  सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून टाकणारे...

शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट

Image
 "बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।  मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग.  आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो.  या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे  मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते.  आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील ये...

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...

Image
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही  आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर  झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ?      तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन  १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या  नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती  मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका.  भाषा मरता देशही मरतो संस...

चला स्किझोफेनिया समजून घेउया आणि रुग्णाचा स्वीकार करूया

Image
वाचक मित्र - मैत्रिणींनो तुम्हाला जानेवारी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर , सुरेखा कुडची , प्रदीप पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अजय फणसेकर दिग्दर्शित ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट किंवा मार्च २००४ साली प्रदर्शित अतुल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी , देविका दफ्तरदार , तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘ देवराई ’ हा चित्रपट आठवतो का ? मी हे विचारतोय कारण हे फक्त करमणूकप्रधान चित्रपट नव्हते , तर माहितीपटाच्या चौकटीत जाणारे ; मात्र त्याचवेळी माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत मनोरंजन करणारे देखील होते . हे दोन्ही चित्रपट स्किझोफेनिया या गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते . ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia) आधारित पहिला चित्रपट मानला जातो , तर ‘ देवराई ’ हा चित्रपट मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे आणि मोठ्या प्रमाणात सखोलतेने...