सिंहावलोकन,२०२५ :भारत आणि जागतिक परिषदा
नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला २०२५ हे वर्ष भारताच्या जागतिक कूटनीतीसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, शिखर संमेलने आणि बहुपक्षीय मंचांवर भारताने सक्रिय सहभाग घेत आपली धोरणात्मक भूमिका अधिक ठामपणे मांडली. G20, BRICS, QUAD, SCO, तसेच हवामान बदलासंदर्भातील COP परिषदांमध्ये भारताची उपस्थिती केवळ प्रतिनिधित्वापुरती मर्यादित न राहता निर्णयप्रक्रियेत प्रभावी ठरली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भारताने G20 मंचावर विकसनशील देशांचे प्रश्न, कर्जसंकट, पुरवठा साखळीतील स्थैर्य आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर भर ...