ऑलम्पिक पदकांचा विचार करताना याही गोष्टी बघा मित्रांनो!
रविवार ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा संपली.या स्पर्धेत भारताची पदकतालिका मोठ्या प्रमाणात निराशाजनक दिसली.५० किलो वजनी गटात महिला कुस्तीवीर विनीता फोगट यांना सुवर्ण पदकच मिळाले,असे क्षणभर समजले तरी पदकतालिकेतील आपले स्थान फार काही उंचावत नाही.सुरवातीला ज्या खेलो इंडीयाचा सातत्याने उल्लेख करण्यात आला.त्याचा काहीच सकारात्मक परीणाम यावेळी झालेला दिसला नाही.आता या बाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधिकारी पक्षाकडून वेगवेगळे दावे प्रतीदावे करण्यात येतील,त्यामुळे अनेकांचा गैरसमज होईल तो होवू नये, म्हणून आजचे लेखन तर मित्रांनो चीन अमेरिका या देशांना मोठ्या संख्येने पदके का मिळतात?,हे समजुन घेण्याआधी ऑलम्पिक स्पर्धा कशी खेळवण्यात येते, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. स्पर्धेतील सर्व खेळ एकदाच खेळवण्यात येवून त्यातून आंतीम विजेता काढला असे होत नाही.तर काही खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळवण्यात येवून स्पर्धेत रंगत वाढवली जाते.उदाहरण म्हणून आपण पोहणे हा प्रकार घेवूया .आता पोहणे फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक. ब्रेक स्ट्रोक आणि बटर फ्लाय, या चार प्रकारे करता येते.आता या पोहण्याचा स्पर